Shri Pachlegaonkar Maharaj श्री पाचलेगावकर महाराज

  • Home
  • India
  • Mumbai
  • Shri Pachlegaonkar Maharaj श्री पाचलेगावकर महाराज

Shri Pachlegaonkar Maharaj  श्री पाचलेगावकर महाराज Mukteshwar Ashram
A spiritual trust formed by Parampujya Baba Maharaj Garge inspired by his Sadguru, Parampujya Shri Sant Pachlegaonkar Maharaj.

पाचलेगांवकर महाराज हे हैदराबाद च्या जुलमी निजामशाही विरुद्ध स्वातंत्र्यासाठी लढलेले गुरू होत. यांचा जन्म ८/११/१९१२ या दिवशी पाचलेगावी ता. जिंतूर जिल्हा परभणी महाराष्ट्र राज्यात झाला. श्री राजारामपंत कुळकर्णी आणि सौ. कृष्णाबाई उर्फ भागाबाई असे त्यांच्या पालकांचे नाव होते. त्यांचे नृसिंह असे नामकरण झाले. श्री नृसिंह स्वरस्वती हे त्यांचे गुरू होत. त्यांच्या कार्यास बोरी या मराठवाड्यातील गावी जाऊन गाड

गेबाबा, दासगणू महाराज आणि जगतगुरु शंकराचार्य श्री विद्याशंकर भारती यांनी पाठिंबा दिला होता. पाचलेगांवकर महाराज जातीभेदाच्या विरोधात प्रवचने देत. व्यायाम, शक्ती आणि एकजूट यावर त्यांचा भर असे. निजामाच्या विरुद्ध प्रचार केल्याने त्यांना इ.स.१९२८ मध्ये हद्दपार करण्यात आले.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी व उन्नतीसाठी अन्याय प्रतिकार नि न्याय रक्षक अशी कर्तृत्वशाली जनशक्ती जाग्रत करणे.
एका कार्यक्षम बलवान जनशक्तीला योग्य वळण देणे.
अराष्ट्रीय वृत्तीने भरलेल्या लोकांचे संख्याबळ शुध्दीच्या द्वारे घटवून संभाव्य संकटाच्या खाईतून देशाला वाचविणे.

हे कार्य करण्यासाठी त्यांनी मुक्तेश्वर दलाची स्थापना केली. हे दल पुढे तरुण सभा यात एकत्रित केले गेले. त्यांनी सावरकरांची व्याख्याने आयोजित केली. त्यानंतर त्यांच्या कार्याने प्रेरित झालेली जनता पाहून ब्रिटिशांनीही त्यांच्या अटकेचे वॉरंट काढले. महाराज भुमीगत झाले व त्यांनी भारत भ्रमण केले.

महाराजांनी हिंदूंच्या ख्रिस्ती व मुस्लीम धर्मांतरास कडडून विरोध केला. मिरज येथे त्यासाठी जनजागृती केली. हिंदु महासभेच्या शाखा त्यासाठी स्थापन केल्या. मे १९४१ मध्ये ग्वाल्हेर येथे हिंदुराष्ट्र सेना स्थापन केली. जातीभेद विरहित सहभोजने, हिंदू संघटन आणि शिवाजी महाराज जयंतीची मिरवणूक यावर भर दिला जाई. ख्रिश्चनांनी अनेक प्रकारे धर्मांतर केलेल्या लोकांना परत हिंदू करून घेतले. खांडवा व जबलपूर जिल्ह्यात प्रचार करून १२०० गावातील हजारो लोकांत प्रचार करून ख्रिस्ती प्रसाराची लाट थोपवली. तेथेही अनेक लोकांना स्वधर्मात घेतले. विशेषतः याच काळात कडवा मिशनरी फॉनवेल हा महाराजांचे कार्य पाहून चकित झाला. हिंदू तत्त्वज्नान त्याने समजून घेतले. व तो ही हिंदू होण्यास उत्सुक झाला. यास सहकुटुंब शुध्द करून घेतले. एक शाळा स्थापन करून फॉनवेल यास शिक्षक म्हणून तेथे नियुक्त केले गेले. बऱ्हाणपूर येथे मुस्लीम पंथीयांनी बाटवलेल्यांना स्वधर्मात घेण्यासाठी २२ ते २४ मार्च १९४५ रोजी एक संगठन यज्ञ घेतला. यासाठी एक लाखाहून अधीक लोक उपस्थित होते. यावेळी १५० कुटुंबांना स्वधर्मात घेतले गेले. सावरकर, भाई परमानंद, श्यामाप्रसाद मुखर्जी, जुगलकिशोर बिर्ला, अनेकांचे शुभेच्छा संदेश त्यासाठी आले होते. तत्कालिन शिक्षण मंत्री (मध्य प्रदेश) श्री बाबासाहेब खापर्डे यांच्या अध्यक्षतेत यज्ञाचा समारोप झाला होता. In early twenty century, in the year 1908 Parampujya Shri Sant Pachlegaonkar Maharaj was born in Pachlegaon a small village in Marathwada region (Parbhani District) of Maharashtra state in India. He was named as Nrusinha by his parents. One day Guru Parampujya Madhavashram Swami visited Pachlegaon and told to parents of Pachlegaonkar Maharaj to name him as “Sanchareshwar” means one who roams (travels). He was born yogi. From childhood he had Siddhi to handle snakes. He was not a Yogi who only worshipped God but was also a freedom fighter who established Mukteshwar Dal to teach children the art of warship with lathis and swords. “Nizam” the then king of Hyderabad had tried to put him behind bars but he escaped & fought the battle of freedom. He is the founder of “Samasthi Dharma” which means Dharma for all segments of society. He gave spiritual teachings to his worshippers but at the same time emphasized on social activities. He loved the children the most and especially was inclined towards the upbringing of poor and backwards classes of society. Parampujya Shri Baba Maharaj Garge was blessed by Pachlegaonkar Maharaj. Name of Baba Maharaj was Nilkanth but Pachlegaonkar Maharaj used to call him “Nilya” with great love and affection. Pachlegaonkar Maharaj used to call Baba as “Prati Pachlegaonkar” that is incarnation of Pachlegaonkar Maharaj himself. Pachlegaonkar Maharaj once told “Nilya” that he wished to have an ashram at Nagpur, the center of India. To fulfill the wishes of his Guru “Baba Maharaj Garge” started a trust named “Bhartiya Samasthi Dharma Prasarak upasna mandal” in 1987. He found a able disciple in Shri Dada Jakate & by effort of dada Jakate land was donated by Balwant society to build up ashram. In 1993 construction work of Mukteshwar Ashram at Nagpur started. In the year 1996 the Idols of God were established after proper Pooja. Parampujya baba Maharaj used his spiritual powers to treat the ill, make them healthy & happy. He guided his disciples for their spiritual upliftment and at same time guided him to donate his labour & money for upliftment of poor. In his able guidance Mukteshwar Ashram is engaged in various social activities such as organizing blood donation camps, free eye& health checkup camps. Shram daan to construct road in village , Bal Sanskar camp, Stree shakti Jagruti shibir etc. Various spiritual programs are conducted by ashram through out the year such as Mahashivratri Utsav , Baba Maharaj Samadhi day, Guru Pournima, Pachlegaonkar Maharaj Nirvan Day, Baba Maharaj Jayanti, Pachlegaonkar Maharaj Jayanti, & Datta Jayanti. Weekly activities includes Upasna at Thursday. Please Follow Us

Facebook:- https://www.facebook.com/Shri.Sant.Pachlegaonkar.Maharaj/

YouTube:-
https://www.youtube.com/channel/UCBGsRmHGrtaWBcv2SEWq1MA

For Business Equity Email:- [email protected]

Don't Forget To Like, Comment Share &Subscribe

[ Thanks For Watching This Video ]

From:-
Yogesh Zaware Patil
Shree Pachalegavkar Maharaj Ashram & Team
Mulund, Mumbai India 🇮🇳




Your Quries:-
Shri Pachlegaonkar Maharaj
Rastra Santa Shri Pachlegaonkar Maharaj
राष्ट्र संत श्री पाचलेगावकर महाराज
श्री पाचलेगावकर महाराज
Shree Sanchareshwar Maharaj
Shree Mukteshwar Maharaj
Mukteshwar Ashram
Mukteshwar Ashram Mulund Mumbai
मुक्तेश्वर आश्रम मुलुंड मुंबई
Shri Pachlegaonkar Maharaj Ashram
मुक्तेश्वर आश्रम
पाचलेगावकर महाराज आश्रम
श्री संचारेश्वर महाराज
श्री मुक्तेश्वर महाराज
Dhrma Bhaskar
धर्म भास्कर
rastra santa shree pachalegavkar
rastra santa shree pachalegavkar group
rastra santa shree pachalegavkar maharaj ka bhajan

*आत्मपरीक्षण बोध : प्रपंच व परमार्थ**प्रपंच आणि परमार्थ हे मानवी जीवनातील दोन महत्त्वाचे मार्ग आहेत-एक सहज वाटणारा, तर द...
12/05/2026

*आत्मपरीक्षण बोध : प्रपंच व परमार्थ*
*प्रपंच आणि परमार्थ हे मानवी जीवनातील दोन महत्त्वाचे मार्ग आहेत-एक सहज वाटणारा, तर दुसरा उंच आणि आव्हानात्मक. प्रपंच म्हणजे संसार, विषयसुख, आपल्या इच्छा आणि अपेक्षा यांचा विस्तार. मनाला विषयांमध्ये रमायला नैसर्गिक ओढ असते. चविष्ट अन्न, मान-सन्मान, पैसा, कुटुंबातील प्रेम-या सर्वांमध्ये मनाला तात्पुरता आनंद मिळतो. म्हणूनच प्रपंच सोपा वाटतो. तो प्रयत्न न करता, सहजपणे आपल्याला खेचून घेतो. जणू एखाद्या नदीचा प्रवाह आपोआप खाली वाहतो, तसंच मन विषयांकडे धावत राहतं. परंतु परमार्थ हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहण्यासारखा आहे. परमार्थ म्हणजे "मी" आणि "माझे" या भावनांवर विजय मिळवणे. आपल्या स्वार्थाला बाजूला ठेवून, ईश्वरप्राप्ती किंवा इतरांच्या कल्याणासाठी निस्वार्थ भावाने जगणे. हे ऐकायला सुंदर वाटते, पण आचरणात आणणे कठीण असते.*
*जय श्री संचारेश्वराय*

स्तंभातून प्रकटलेले, भक्त प्रल्हादाच्या हाकेला धावून जाणारे प्रचंड पराक्रमी भगवान श्री नृसिंह यांच्या जयंतीनिमित्त सर्वा...
30/04/2026

स्तंभातून प्रकटलेले, भक्त प्रल्हादाच्या हाकेला धावून जाणारे प्रचंड पराक्रमी भगवान श्री नृसिंह यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा

वाल्मीकि रामायण के उत्तरकांड में वर्णित 'शंबूक वध' की कथा एक अत्यंत चर्चित और विवादास्पद प्रसंग है। यह घटना राम के आदर्श...
26/04/2026

वाल्मीकि रामायण के उत्तरकांड में वर्णित 'शंबूक वध' की कथा एक अत्यंत चर्चित और विवादास्पद प्रसंग है। यह घटना राम के आदर्श शासन (रामराज्य) के दौरान घटित होती है, जब सामाजिक व्यवस्था और धर्म के पालन को सर्वोपरि माना जाता था।

कथा की शुरुआत तब होती है जब एक वृद्ध ब्राह्मण अपने मृत पुत्र के शरीर को लेकर अयोध्या के राजद्वार पर आता है। वह फूट-फूटकर रोते हुए महाराज राम को दोष देता है कि उनके राज्य में एक बालक की अकाल मृत्यु हुई है। शास्त्रानुसार, किसी बालक की मृत्यु पिता से पहले तभी होती है जब राज्य में कोई अधर्म हो रहा हो या कोई अपनी मर्यादा का उल्लंघन कर रहा हो।

राम इस समस्या के समाधान के लिए ऋषियों और मंत्रियों की सभा बुलाते हैं। वहाँ देवर्षि नारद उन्हें बताते हैं कि इस युग (त्रेतायुग) में केवल ब्राह्मण और क्षत्रिय को ही तपस्या करने का अधिकार है। नारद जी कहते हैं कि कोई 'शूद्र' व्यक्ति मर्यादा के विरुद्ध जाकर कठोर तपस्या कर रहा है, जिससे वर्ण-व्यवस्था भंग हो रही है और इसी अधर्म के कारण ब्राह्मण पुत्र की मृत्यु हुई है।

अपने राज्य से अधर्म को दूर करने के लिए राम स्वयं पुष्प विमान पर सवार होकर खोज पर निकलते हैं। दक्षिण दिशा में शैवल पर्वत के पास एक सरोवर के किनारे उन्हें एक तपस्वी मिलता है, जो कठोर तपस्या कर रहा होता है। वह तपस्वी पेड़ से उल्टा लटककर धूनी रमा रहा था।

राम उस तपस्वी के पास जाकर उसका परिचय पूछते हैं। तपस्वी उत्तर देता है - "हे राम! मैं शंबूक हूँ और जाति से शूद्र हूँ। मैं इसी शरीर के साथ देवलोक (स्वर्ग) को जीतना चाहता हूँ और देवताओं जैसा पद प्राप्त करने के लिए यह तपस्या कर रहा हूँ।"

जैसे ही शंबूक अपना परिचय और उद्देश्य स्पष्ट करता है, राम अपनी तलवार निकालते हैं और उसका शीश काट देते हैं। शास्त्र सम्मत मर्यादा का उल्लंघन करने के कारण राम उसे दंडित करते हैं।

जैसे ही शंबूक का वध होता है, अयोध्या में वह मृत ब्राह्मण पुत्र पुनः जीवित हो उठता है।
स्वर्ग के देवता राम के इस कार्य की प्रशंसा करते हैं और उन पर पुष्प वर्षा करते हैं। वे कहते हैं कि राम ने अधर्म को रोककर धर्म की रक्षा की है।

इसे राम द्वारा 'राजधर्म' का पालन माना जाता है, जहाँ राजा का कर्तव्य समाज की स्थापित मर्यादा और नियमों (वर्ण व्यवस्था) को बनाए रखना था ताकि प्रजा को कष्ट न हो।
जय सियाराम 🙏

*गुरुतत्वाचार**मद"*म्हणजे अहंकार, गर्व - हा षड्रिपूंमधील अत्यंत सूक्ष्म पण धोकादायक शत्रू आहे. तो मनुष्याच्या अंतःकरणात ...
12/04/2026

*गुरुतत्वाचार*
*मद"*
म्हणजे अहंकार, गर्व - हा षड्रिपूंमधील अत्यंत सूक्ष्म पण धोकादायक शत्रू आहे. तो मनुष्याच्या अंतःकरणात इतक्या नकळत शिरतो की, स्वतःला तो दोष वाटतच नाही. उलट, "मी श्रेष्ठ आहे", "माझ्यामुळेच सर्व होत आहे" अशी भावना मनात निर्माण होते.
हीच भावना पारमार्थिक उन्नतीच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा ठरते. मदामुळे मनुष्याचा विवेक नष्ट होऊ लागतो. तो स्वतःच्या गुणांवर, ज्ञानावर, संपत्तीवर किंवा पदावर गर्व करू लागतो. पण या गर्वामुळे तो परमात्म्यापासून दूर जातो. कारण अध्यात्माचा पाया हा नम्रतेवर आहे, आणि जिथे नम्रता नाही, तिथे कृपा टिकत नाही. जसे भरलेले भांडे पाणी स्वीकारू शकत नाही, तसेच अहंकाराने भरलेले मन गुरुकृपा आणि ज्ञान स्वीकारू शकत नाही. भावनिकदृष्ट्या पाहिले तर, मद मनुष्याला इतरांपासून दूर नेतो. तो इतरांना कमी लेखतो, त्यांच्या भावना समजून घेत नाही. त्यामुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो आणि अंतःकरणात एकाकीपणा वाढतो. बाहेरून सर्व काही असले तरी आतून रिक्तता जाणवत हेच मदाचे खरे दुःख आहे. अध्यात्मिक मार्गावर प्रगती करण्यासाठी मदाचा त्याग करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी सतत आत्मपरीक्षण, नामस्मरण आणि गुरूचरणी शरणागती हाच खरा उपाय आहे. "सर्व काही परमेश्वराच्या कृपेनेच घडते" ही भावना मनात दृढ झाली की, अहंकार आपोआप कमी होतो. मद सोडणे म्हणजे स्वतःला कमी लेखणे नव्हे, तर खरे स्वरूप ओळखणे होय. जेव्हा मन नम्र होते, तेव्हा त्यात प्रेम, करुणा आणि शांतता फुलते. अशा निर्मळ मनातच परमात्म्याचा वास होतो. आणि तेथेच पारमार्थिक उन्नतीचा खरा आरंभ होतो.*
*जय श्री संचारेश्वराय*

🚩 *तुम्हाला आपल्या गोत्राची खरी शक्ती माहिती आहे का*हे केवळ एक विधी नाही. अंधश्रद्धा तर मुळीच नाही. हे आहे तुमचं प्राचीन...
06/04/2026

🚩 *तुम्हाला आपल्या गोत्राची खरी शक्ती माहिती आहे का*

हे केवळ एक विधी नाही. अंधश्रद्धा तर मुळीच नाही. हे आहे तुमचं प्राचीन सांकेतिक वारसत्व—एक आत्मिक कोड. हे संपूर्ण लेखधागा वाचा, असं समजा की तुमचं भूतकाळच त्यावर अवलंबून आहे.

*१. गोत्र म्हणजे तुमचं आडनाव नाही—ते तुमचं आध्यात्मिक DNA आहे*

आपण बहुतेकजण आपल्या गोत्राबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ आहोत. आपण समजतो की पुजेमध्ये पुजारी जे काही म्हणतो त्याचा तो भाग आहे, पण ते तितकंच नाही. गोत्र म्हणजे तुम्ही कोणत्या ऋषींच्या मनोवृत्तीशी जोडलेले आहात. हे रक्तानं नाही, तर विचारांनी, ऊर्जेने, कंपनांनी आणि ज्ञानधारेनं जोडलेलं असतं. प्रत्येक हिंदूचा आत्मिक स्रोत एखाद्या ऋषीकडे जातो. तो ऋषी म्हणजे तुमचा बौद्धिक पूर्वज. त्याचं ज्ञान, मनोस्वभाव, अंतर्गत ऊर्जा—हे सगळं तुमच्यात वाहत असतं.

*२. गोत्र म्हणजे जात नाही*

आज बरेच लोक गोत्र आणि जात एकत्र करून पाहतात. पण गोत्र हे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य किंवा शूद्र याचं प्रतीक नाही. ते जातप्रथा, आडनावं, आणि राज्ये उदयास येण्यापूर्वीच अस्तित्वात होतं. गोत्र म्हणजे ज्ञानाधारित ओळख—सत्ताधारित नव्हे. ज्यांनी ऋषींचे शिक्षण प्रामाणिकपणे आत्मसात केले, त्यांनाही ऋषी गोत्र देत असत. हे कमावलेलं असतं—जन्मसिद्ध नव्हे. म्हणून गोत्र हे एक शिक्का आहे—तुमच्या आध्यात्मिक परंपरेचा.

*३. प्रत्येक गोत्र एखाद्या ऋषीकडून उगम पावलेलं असतं—एका सुपरमाइंड कडून*

उदा. तुम्ही वसिष्ठ गोत्रातले असाल, तर तुम्ही त्या वसिष्ठ ऋषींच्या परंपरेतले आहात ज्यांनी श्रीराम आणि दशरथ राजाला मार्गदर्शन केलं. भरद्वाज गोत्रातले असाल, तर तुम्ही त्या ऋषींच्या वंशातले आहात ज्यांनी वेदांचे अंश लिहिले, योद्धे आणि पंडित घडवले. प्रमुख ४९ गोत्रे आहेत—प्रत्येक ऋषी वैज्ञानिक, योद्धा, मंत्रद्रष्टा, वैद्य किंवा खगोलतज्ञ होते.

*४. एकाच गोत्रातील विवाहास वडीलधारी मंडळींनी का मनाई केली*

प्राचीन भारतात गोत्राचा वापर जनुकीय ओळख राखण्यासाठी होत असे. गोत्र पुरुषवर्गातून पुढे जाते, म्हणजे मुलगा ऋषीवंश पुढे नेत असतो. एकाच गोत्रात विवाह केला, तर दोघंही अनुवांशिकदृष्ट्या खूप जवळचे—म्हणजे बहीणभावासारखे—असतात. यामुळे संततीमध्ये मानसिक व शारीरिक दोष होऊ शकतात. गोत्रपद्धती म्हणजे प्राचीन भारतीय जनुकीय शास्त्र. आपण हे हजारो वर्षांपूर्वीच ओळखलं होतं—जे पाश्चात्य शास्त्राने अलीकडेच शोधलं.

*५. गोत्र म्हणजे तुमचं मानसिक संप्रेषण*

काही लोक जन्मतःच विचारवंत असतात. काहींच्या आत्म्यात आध्यात्मिक तहान असते. काहींना निसर्गात शांतता वाटते. काही स्वाभाविक नेते असतात. का? कारण तुमच्या गोत्रातील ऋषींचं मन अजूनही तुमचं अंतरंग घडवत असतं. तो ऋषी जसा विचार करत होता, जसं अनुभवत होता, जसा प्रार्थना करत होता—तसंच काहीसं तुमच्या विचारांमध्ये झलकत असतं. ही जादू नाही—ही आहे डीप कोडिंग.

*६. गोत्राचा उपयोग शिक्षणपद्धती ठरवण्यासाठी होत असे*

प्राचीन गुरुकुलात प्रत्येकाला एकसारखं शिकवलं जात नसे. गुरु पहिलाच प्रश्न विचारत: "बाळा, तुझं गोत्र काय?" हे का विचारायचं? कारण त्यातून समजायचं की कोणत्या प्रकारचं ज्ञान त्या विद्यार्थ्यास योग्य आहे. कोणते मंत्र त्याच्या ऊर्जेला सुसंगत आहेत. उदा. अत्री गोत्राचा विद्यार्थी ध्यान आणि मंत्रविद्येत पारंगत होतो. कश्यप गोत्राचा विद्यार्थी आयुर्वेदात गूढ प्रवेश करतो. गोत्र म्हणजे शिक्षणशैली, जीवनमार्ग आणि आत्मस्वरूप.

*७. ब्रिटिशांनी याची थट्टा केली आणि आपण विसरलो*

जेव्हा ब्रिटिश भारतात आले तेव्हा त्यांनी गोत्रपद्धतीला अंधश्रद्धा म्हणून हिणवलं. बॉलीवूडने पुजाऱ्यांच्या गोत्र विचारण्याची चेष्टा केली. आणि हळूहळू आपण आपल्या आजीआजोबांना विचारणं थांबवलं, आपल्या मुलांना सांगणं बंद केलं. दहा हजार वर्षांची परंपरा फक्त शंभर वर्षांत हरवली. कोणी नष्ट केली नाही—आपणच विसरलो.

*८. जर तुम्हाला तुमचं गोत्र माहित नसेल — तर तुम्ही एक नकाशा गमावला आहे*

कल्पना करा, तुम्ही एखाद्या प्राचीन राजघराण्यातले आहात, पण तुमचं आडनाव काय आहे हेच माहीत नाही. तसंच आहे गोत्राचं महत्त्व. गोत्र म्हणजे तुमचं आध्यात्मिक GPS — जे तुम्हाला योग्य मंत्र, विधी, ऊर्जा उपचार, वैयक्तिक साधना आणि विवाहासाठी योग्य जोड मिळवण्यासाठी मार्ग दाखवतं. गोत्राशिवाय आपण धर्माच्या वाटेवर अंधारात चालणारे होतो.

*९. गोत्र सांगणं हे “फक्त औपचारिकता” नव्हतं*

पुजेमध्ये पंडित जेव्हा तुमचं गोत्र उच्चारतो, तेव्हा तो केवळ एक विधी करत नसतो — तो तुम्हाला तुमच्या ऋषिपरंपरेशी पुन्हा जोडत असतो. तुमच्या आत्मिक वंशपरंपरेला साक्षी म्हणून बोलावतो, आणि आशीर्वादाची वाट मोकळी करतो. म्हणूनच संकल्पात गोत्र सांगणं हे अत्यंत पवित्र विधान असतं — “मी, भरद्वाज ऋषींचा वंशज, पूर्ण आत्मचेतनेने देवतांचे साहाय्य मागतो.”

*१०. तुमचं गोत्र जतन करा — उशीर होण्याआधी*

आईवडिलांना, आजीआजोबांना विचारा. माहिती नसेल, तर शोधा. पण ते माहीत नसणं म्हणजे आपली मुळं विसरणं. ते लिहून ठेवा, मुलांना सांगा, आणि अभिमानाने उच्चारा. तुम्ही २००० साली जन्मलेले असाल तरी, तुमचं गोत्र हजारो वर्षांपूर्वीच्या ऋषीने पेटवलेली दिव्य ज्योत आहे. तुम्ही त्या अजरामर कथेचं आत्ताचं शेवटचं पान आहात.

*११. तुमचं गोत्र म्हणजे आत्म्याचं विसरलेलं पासवर्ड*

आज आपण Wi-Fi पासवर्ड, ईमेल लॉगिन, Netflix कोड लक्षात ठेवतो. पण सगळ्यात जुना पासवर्ड — आपलं गोत्र — विसरतो. तो एकच शब्द तुमचं पूर्वजांचं ज्ञान, मानसिक सवयी, कर्माचे संस्कार आणि आत्मिक बल उघडू शकतो. हे फक्त एक लेबल नाही — ही एक किल्ली आहे. ती वापरा… नाहीतर गमवा.

*१२. स्त्रिया विवाहानंतर गोत्र ‘गमावत’ नाहीत — त्या ते मौनपणे जपत असतात*

अनेकांना वाटतं की लग्नानंतर स्त्रियांचं गोत्र बदलतं, पण सनातन धर्म अतिशय सूक्ष्म आहे. श्राद्ध विधीत स्त्रीचं गोत्र वडिलांकडून घेतलं जातं — कारण गोत्र Y-क्रोमोसोमने पुरुषवाटे पुढे जातं. स्त्रिया गोत्राची ऊर्जा वाहक असतात, पण ते आनुवंशिकदृष्ट्या पुढे नेत नाहीत. म्हणून स्त्रीचं गोत्र लग्नानंतरही तिच्या अस्तित्वात जिवंत असतं.

*१३. देवांनीसुद्धा गोत्र नियम पाळले होते*

रामायणात जेव्हा प्रभु राम आणि सीतेचं लग्न झालं, तेव्हा त्यांचं गोत्र तपासलं गेलं:

राम: इक्ष्वाकु वंश, वसिष्ठ गोत्र

सीता: जनक राजा यांची कन्या, कश्यप गोत्र

प्रेमाखातर त्यांनी धर्माचे नियम झुगारले नाहीत. देवसुद्धा गोत्रसंहिता पाळत होते — हे याचं महत्त्व सिद्ध करतं.

*१४. गोत्र आणि प्रारब्ध कर्म यांचा संबंध आहे*

कधी असं वाटतं का, की लहानपणापासून तुम्ही काही विशिष्ट गोष्टींमध्ये आकर्षित होता? ते प्रारब्ध कर्म असतं — या जन्मात फळ देणारी कर्मबीजं. प्रत्येक ऋषींच्या कर्मधारा वेगळ्या होत्या. तुम्ही त्यांच्या गोत्रात असल्यामुळे, ती कर्मसंस्कृती तुमच्यावरही असते. गोत्र समजणं म्हणजे तुमचं कर्ममार्ग जाणून घेण्याची गुरुकिल्ली.

*१५. प्रत्येक गोत्राशी विशिष्ट देवता आणि बीजमंत्र जोडलेले असतात*

गोत्र म्हणजे केवळ मनोवृत्ती नव्हे — ते विशिष्ट देवता आणि बीजमंत्रांशी सुसंगत असतं. कधी वाटतं का की एखादा मंत्र “काम करत” नाही? कदाचित तुम्ही तुमच्या आत्मिक ऊर्जेला सुसंगत मंत्र न वापरताय. योग्य गोत्र + योग्य मंत्र = आध्यात्मिक प्रवाह. हे समजल्यास ध्यान, साधना आणि उपचारशक्ती १० पट वाढते.

*१६. गोत्र = अंतःप्रेरणा गोंधळात*

आज बरेच लोक हरवलेले वाटतात — उद्दिष्ट काय? जीवनमार्ग कोणता? नातेसंबंध कसे असावेत? पण जर तुम्ही शांत बसलात आणि तुमचं गोत्र, ऋषी, परंपरा यांचा विचार केला, तर अंतःप्रेरणा जागृत होते. तुमचा ऋषी गोंधळात नव्हता. त्याची विचारलहर अजूनही तुमच्या नसानसांत आहे. तिला अनुसरलं, तर स्पष्टता मिळते.

*१७. प्रत्येक थोर हिंदू सम्राटाने गोत्राचा सन्मान केला*

चंद्रगुप्त मौर्य, हर्षवर्धन, शिवाजी महाराज — सगळ्यांनी राजगुरु नेमले, जे कुल, गोत्र आणि परंपरा यांची नोंद ठेवत. राजकीय आणि सामाजिक निर्णय घ्यायचाही आधार गोत्रावर असायचा. गोत्र म्हणजे केवळ एक ओळख नव्हे — ती संस्कृतीची शिरा आहे. तिला दुर्लक्ष करणं म्हणजे आपल्या मुळालाच नाकारणं.

*१८. गोत्रपद्धतीने स्त्रियांना संरक्षण दिलं*

आधुनिक भाषेत बोलायचं झालं, तर गोत्र ट्रॅकिंग ही एक सुरक्षाव्यवस्था होती. ती पिढीतील विवाह टाळण्यासाठी, रक्तसंबंध जपण्यासाठी आणि स्त्रियांच्या सन्मानासाठी होती. युद्धात हरवलेल्या किंवा अपहृत स्त्रियांनाही त्यांच्या गोत्रामुळे पुन्हा समाजात स्थान मिळवता आलं. ही मागासपणा नव्हे — ही पुरातन बुद्धिमत्ता होती.

*१९. गोत्र म्हणजे तुमची कॉस्मिक भूमिका*

प्रत्येक ऋषी ब्रह्मांडासाठी एका विशिष्ट कार्यासाठी झटत होता:

काही शरीरोपचारात पारंगत

काही खगोलशास्त्रज्ञ

काही धर्मरक्षक

काही न्यायसंस्थापक

तुमचं गोत्र त्या उद्देशाचं पडसाद घेऊन येतं. तुम्हाला आयुष्यात रिकामेपण जाणवतं? कदाचित तुम्ही तुमची ब्रह्मांडीय भूमिका विसरलात. गोत्र शोधा. भूमिका सापडेल.

*२०*. *हे धर्माबद्दल नाही — ही ओळखीबद्दल आहे*

तुम्ही नास्तिक असाल, फक्त आध्यात्मिक असाल, विधी-धर्मांबद्दल गोंधळलेले असाल — तरीही गोत्र महत्त्वाचं आहे. कारण हे धर्माच्या पलिकडचं आहे. हे आहे पूर्वजांचं भान. हे आहे भारतीय तत्वज्ञानाचं मौन मार्गदर्शन. त्यावर विश्वास ठेवणं गरजेचं नाही — पण ते आठवणं गरजेचं आहे.

*अंतिम शब्द*:

तुमचं नाव आधुनिक असू शकतं. तुमचं जीवनशैली जागतिक असू शकते.
पण तुमचं गोत्र — कालातीत आहे.
आणि जर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केलंत,
तर तुम्ही त्या नदीसारखे आहात — जी आपला उगम विसरलेली आहे.

गोत्र म्हणजे भूतकाळ नव्हे — ते भविष्यातील ज्ञानाचं पासवर्ड आहे.
ते उघडा — आणि पुढच्या पिढीला ते हरवू देऊ नका.

*जिथे श्रद्धा तिथे राम आणि**जिथे भक्ती तिथे हनुमान....!!* *हनुमान जन्मोउत्सवाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा.....!!*🚩🚩
02/04/2026

*जिथे श्रद्धा तिथे राम आणि*
*जिथे भक्ती तिथे हनुमान....!!*
*हनुमान जन्मोउत्सवाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा.....!!*🚩🚩

*गुरुतत्वाचार**जी व्यक्ती निःशंक व निर्भय असते त्याच्याच पाठीशी स्वामींचे बळ  असते. म्हणूनच तारक मंत्रात म्हंटले आहे* *"...
01/04/2026

*गुरुतत्वाचार*
*जी व्यक्ती निःशंक व निर्भय असते त्याच्याच पाठीशी स्वामींचे बळ असते. म्हणूनच तारक मंत्रात म्हंटले आहे* *"निःशंक हो निर्भय हो मना रे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे" स्वामीबळ हे गुरुतत्त्व सर्वत्रच आहे.मात्र ते ओळखण्यासाठी सकारात्मक मन हव तेव्हाच ते ओळखता येईल. नकारात्मक माणसाला देव जरी भेटला तरी तो त्याला* *मान्य करणार नाही. तिथे पण शंका घेईल. मग स्वामीबळ कस जाणवेल,उलट संकट आल्यावर घाबरून* *स्वतःच्या मनाने काहीतरी करीत असतो. नवस हा प्रकार त्यातूनच निर्माण झाला.देवा अस होऊ दे मग तुला हे देईन, त्याच्याच प्रारब्धाने त्याचा प्रश्न सुटतो ,त्याला* *वाटत मी नवस बोललो म्हणून झाल,तोच प्रचार सर्वत्र केला जातो सर्व नकारात्मक व्यक्ती तसच वागायला लागतात ,मग तो देव, संत नवसाला पावणारा होतो.तिथे माणसाची रीघ लागलेली असते.नवस सुद्धा मग स्वतःच्या श्रीमंती प्रमाणे असतात.*
*जय श्री संचारेश्वराय*

*श्री राम नवमीच्या आपण व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा*🙏श्री राम कृपेने  आपल्याला आनंद,समृद्धी आणि निरामय आरोग्य लाभो ...
26/03/2026

*श्री राम नवमीच्या आपण व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा*🙏
श्री राम कृपेने आपल्याला आनंद,समृद्धी आणि निरामय आरोग्य लाभो ही सदिच्छा

..... *श्रीरामनवमी उत्सव*.....🌷 *llश्री* *चिन्मय* *पादुका*  *संचारेश्वर* *ट्रस्ट* , *मुलुंड* , ( *पश्चिम* ) *मुंबई* 🌷   ...
25/03/2026

..... *श्रीरामनवमी उत्सव*.....

🌷 *llश्री* *चिन्मय* *पादुका* *संचारेश्वर* *ट्रस्ट* , *मुलुंड* , ( *पश्चिम* ) *मुंबई* 🌷

*सस्नेह* *अभिवादन* *!*
*श्री रामनवमी, चैत्र शु.८, गुरूवार* *दि*. *२६* / *०३* / *२०२६*,
आश्रमात सुश्राव्य कीर्तन सामुदायिक उपासना, इत्यादी कार्यक्रम होतील.
*सकाळी* *१०* : *००* *ते* *१२* : *३०* *वाजता* " *श्रीराम* " जन्मावर आधारित ह.भ.प.सौ.अपर्णाताई मनोज खंडागळे मुलुंड,पुर्व, मुंबई ,यांचे सुश्राव्य कीर्तन ( *१२: ०० श्रीराम* *जन्म* - *पाळणा* )

*सायंकाळी०७:३०* *वाजता सामुदायिक* *नित्य* *उपासना* व तीर्थ - प्रसाद

ज्यांना आॕन लाईन किंवा क्यू आर कोड द्वारे *श्रीराम* *जन्मोत्सवा* निमित्ताने गुरु दक्षिणा/ देणगी पाठवायची असेल त्यांच्या साठी विशेष सुचना अशी की त्यानी स्वतःचे नाव आवर्जून उल्लेख करावा व गुरुदक्षिणा/ देणगी खालील बॕंक अकाउंट मधे ट्रान्सफर केल्यावर नाव ,रक्कम व दिनांक खाली दिलेल्या व्हाॕटसॕप नंबरवर स्क्रीन शाॕट पाठवणे म्हणजे पावती बनवणे सोपे होईल-
बँक आॕफ महाराष्ट्र -मुलुंड (प) ,
अकाउंट चे नाव:- Chinmay Paduka Sanchareshwar Trust.
अकाऊंट नंबर-20097246578 IFSC Code: MAHB0000090.
ज्याना *गुरुदक्षिणा* / *देणगी* कॕश स्वरुपात द्यायची असेल त्यानी कॕश देवुन त्वरीत पावती घ्यावी ही विनंती.
|| गुरुदेव दत्त ||

श्री चरण सेवेत🙏
विश्वस्त मंडळ,
चिन्मय पादुका संचारेश्वर ट्रस्ट.
मुलुंड, मुंबई

संपर्कःश्री विठ्ठल परब
मो.नं-8451825781
श्री.जयप्रकाश ठाकूर
मो.नं-9920672942
श्री.गुरुनाथ दळवी
मो.नं-9869201235 ‌श्री.अवधुत सारंग
मो.नं.9594343783
दिनांक:२३/०३/२०२६🌼

22/03/2026
राम राम मंडळी सुप्रभात,ll 🕉️ ब्रह्म ध्वजाय नम: ll*ब्रह्म ध्वज नमस्ते स्तु सर्वा भिष्ट फलप्रद l**प्राप्तेस्मिन्वत्सरे नित...
19/03/2026

राम राम मंडळी सुप्रभात,

ll 🕉️ ब्रह्म ध्वजाय नम: ll

*ब्रह्म ध्वज नमस्ते स्तु सर्वा भिष्ट फलप्रद l*
*प्राप्तेस्मिन्वत्सरे नित्यं मद्गहे मंगलम कुरू ll*
अर्थ : "हे ब्रह्मध्वजा, ह्या नवीन वर्षात सर्वांना सुख, समाधान आणि उत्तम आरोग्य लाभु दे. घरादारावर तुझे शुभाशिर्वाद असु दे".

गुढी उभी, पाडवा आला,
नववर्षाचा उल्हास झाला!
सुख-समृद्धीचे द्वार खुले,
समष्टी धर्मा ने या स्वागताला.

जीवनात भरला रंग चैतन्याचा!
वसंत ऋतूचा सुगंध पसरला,
श्रींचे स्मरण करुनी एकात्मतेचा,
नवचैतन्याचा जयजयकार झाला!

ll गुढी पाडव्याच्या शुभेच्छा ll

Address

Mukteshwar Ashram: Places Of Worship In MULUND COLONY, MULUND WEST
Mumbai
400080

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Pachlegaonkar Maharaj श्री पाचलेगावकर महाराज posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shri Pachlegaonkar Maharaj श्री पाचलेगावकर महाराज:

Share